google-site-verification: googlea4a4b36c9de51f26.html
Saturday, June 20, 2026
मितवा
  • मुख्य पान
  • कथा
  • वैचारिक
  • मितवा
  • कथामालिका
  • कविता
  • नारीवाद
  • प्रेम
  • भयपट
  • मनोरंजन
  • माहितीपूर्ण
  • राजकीय
  • विज्ञान
  • विनोदी
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
मितवा
No Result
View All Result

जगण्याचा संघर्ष – भाग १

alodam37 by alodam37
June 17, 2026
in कथा, वैचारिक
0
जगण्याचा संघर्ष – भाग १
0
SHARES
7.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अभयचे आजी आजोबा नुकतेच घरी आले होते. आज त्यांची पेन्शन काढायला ते तालुक्याला गेले होते. एका सरकारी योजनेतून आजोबा आणि आजीला दर महिन्याला दोन दोन हजारांची पेंशन मिळायची. त्यावर घर कसतरी चालायचं.

नेहमीप्रमाणे आज सुद्धा घरी आल्यावर त्यांनी अभयला आवाज दिला आणि त्याच्या हातावर कागदात बांधलेला जिलबीचा पुडा दिला. आणि म्हणाले.

” घे बाळ…तुला आवडते ना जिलबी…तुझ्यासाठी आणली आहे…”

” कशाला आजोबा…उगाच खर्च…यात कशाला पैसे खर्च केले…” अभय काळजीने म्हणाला.

” इतक्या लहान वयात इतकी जास्त काळजी नको करू बाळा…तुझा आजोबा आहे ना तुमची काळजी घ्यायला… भागेलच कसतरी…” आजोबा मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले.

” आणि तुमची चप्पल खराब झाली होती…ती केली का दुरुस्त…” अभय म्हणाला.

” हो रे बाळा…केली दुरुस्त…” आजोबा म्हणाले.

” ही घे जिलबी आणि खा…” आजोबा म्हणाले.

” हो आजोबा…मी राधाला बोलावून आणतो…आणि दोघे मिळून खातो…” अभय म्हणाला.

आणि अभयने बाहेरच खेळत असलेल्या त्याच्या लहान बहिणीला हाक मारली. दादाची हाक ऐकून ती लगेच त्याच्याजवळ आली. तिच्या हाती जिलबी देत अभय म्हणाला.

” ही घे…आजोबांनी आणली आहे…तुला खूप आवडते ना…”

” वा वा….जिलबी…लवकर दे ना…मला खूप आवडते…” राधा म्हणाली.

आणि अभय ने जिलबी खायला दिली. राधाला जिलबी खूप आवडली. तिने अगदी मनसोक्त खाल्ली. अभय फक्त राधाला जिलबी खाताना बघत होता. तिच्या चेहऱ्यावरील समाधान पाहूनच त्याचे पोट भरत होते. तिचं खाऊन झालं आणि ती अभयला म्हणाली.

” माझं पोट भरलय दादा…आता तू खा…मी बाहेर खेळायला जाते…”

आणि लगेच खेळायला पळाली सुद्धा. अभय जिलबी खायला जाणार इतक्यात त्याला आठवलं की राधाला जिलबी खूप आवडते. ह्यातील जिलबी उरली तर तिला उद्याही खाता येईल. आणि त्याने जिलबी खाल्लीच नाही.

त्याला आठवले की मागच्या वेळी शेजारच्या काकूंच्या घरी टीव्ही पाहायला गेलो होतो तेव्हा त्यांच्या मुलीला जिलबी खाताना पाहून राधाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. आणि हे जेव्हा त्या काकूंच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी टीव्ही बंद करून तिला जायला सांगितले आणि नंतरच त्यांच्या मुलीला जिलबी खाऊ घातली होती. अभय सुद्धा त्यावेळी तिथेच होता. त्याला खूप राग आला होता आणि त्याहूनही जास्त वाईट वाटले होते. पण तो काहीच करू शकत नव्हता. परिस्थिती मुळे त्याचे हात बांधले गेले होते.

अभय आणि राधा दोघेही भावंडं. अभय आठ वर्षांचा तर राधा सहा. दोघेही आपल्या आजी आजोबांकडे राहायचे. त्याच्या वडिलांना देवाघरी जाऊन एक वर्ष झालं. आता फक्त त्यांची आईच त्यांचा आधार उरली होती. वडिलांचं छत्र तर गमावलं होतं पण निदान आई आपल्या सोबत आहे ही जाणीवही त्यांना खूप आधार देत होती.

पण बाबांच्या गेल्यानंतर अभय आणि राधा त्यांच्या आईसोबत काही दिवसांसाठी त्यांच्या मामांच्या घरी गेले आणि तिथे कोणीतरी आईसाठी स्थळ सुचवले. आई सुद्धा सततच्या हलाखीच्या जीवनाला कंटाळली होती. मग तिने मन कठोर केलं आणि दुसऱ्या लग्नाला होकार दिला. पण तिच्या दुसऱ्या नवऱ्याला तिच्या मुलांना ठेवून घ्यायचं नव्हतं. मग आईचं लग्न झाल्यावर मुलांना तिथून पुन्हा त्यांच्या आजी आजोबांकडे पाठवून दिलं मामाच्या घरच्यांनी.

अभय आणि राधा दोघेही खूप रडले आईसाठी. त्यांना त्यांच्या आईसोबत राहायचं होतं. पण आईने सुद्धा स्वतःच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. आणि सोबतच ही दोन्ही भावंडे पोरकी झाली होती. सुदैवाने त्यांच्या आजी आजोबांनी त्यांना मायेने जवळ केले आणि त्यांच्या प्रेमाने का होईना अभय आणि राधाच्या दुःखावर थोडीशी फुंकर घातली.

तरीही राधाला तिच्या आई वडिलांची खूपच आठवण यायची. लहान पोर ती. आईच्या आठवणीने हमसून हमसून रडायची. अशावेळी मग अभय स्वतःचे दुःख लपवून तिचे अश्रू पुसायचा. तिला हसवण्याचा प्रयत्न करायचा. राधा सुद्धा अभय ला तिचं सर्वस्व मानायची. राधाला काहीही त्रास होऊ नये म्हणून अभय सर्वतोपरी प्रयत्न करायचा.

अभय जसजसा मोठा होत होता तसतसा तो आणखीनच समजदार होत होता. अभ्यासात तर अभय आधीपासूनच हुशार होता. पण त्याला लहान वयातच हे कळून चुकले होते की आपल्याला आपली परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. स्वतःसोबतच तो राधाच्या अभ्यासाकडे ही काटेकोरपणे लक्ष द्यायचा.

राधा सुद्धा आपल्या दादा सारखीच हुशार आणि समजदार होती. दोघांनाही आपल्या परिस्थितीची पुरेपूर जाण होती. आईवडील नसताना आपणच एकमेकांचा आधार बनायला हवे हे इतक्या लहान वयात सुद्धा दोघांना कळलं होतं.

अभय जसजसा मोठा होत होता तसतसा तो अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा इतर कामे करायला लागला होता. जेणेकरून तो घरी आर्थिक हातभार लावू शकेल. आणि सोबत अभ्यासही चांगला सुरू होता. दोघांचीही अभ्यासातील प्रगती पाहून त्यांचे शिक्षक सुद्धा त्यांच्यावर खुश होते. त्यांच्या शिक्षकांनी एकदा शाळेत सगळ्यांनाच स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती दिली.

आपण चांगला अभ्यास करून परीक्षेत पास झालो तर भविष्यात चांगले अधिकारी बनू शकू हे अभयला कळले होते. त्याने त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला. त्यांच्या शिक्षकांनी सुद्धा त्यांना या बाबतीत खूप मार्गदर्शन केले.

अभय बारावी आणि राधा दहावी उत्तम मार्गांनी पास झाले.पण दुर्दैवाने त्याचा सगळ्यात मोठा आधार असणारे आजोबा त्याच वर्षी वारले. अभयला पुढे शिकायची खुप इच्छा होती पण घरची जबाबदारी घेणे सुद्धा गरजेचे होते. शिवाय राधाचं पुढील शिक्षण चांगलं व्हावं अशी अभयची इच्छा होती.

म्हणून अभयने पुढे मुक्त विद्यापीठात बी ए ला एडमिशन घेतली आणि सोबतच एका मोठ्या किराणा दुकानात नोकरी सुद्धा करू लागला. पण त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागला. जसजसे तो या जगातील कटू अनुभव घ्यायचा तसतशी आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची त्याची जिद्द वाढतच जायची.

पण एके दिवशी असा एक प्रसंग घडला ज्याने अभयला त्याचं दुर्दैव किती मोठं आहे ह्याची जाणीव झाली.

एके दिवशी अचानक सामान पोहचवायचे म्हणून तो एका घरी गेला. चांगलं आलिशान घर होतं. त्याने दाराची बेल वाजवली. आत मधून चांगले हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते. एका वयस्कर स्त्री ने दरवाजा उघडला. तिला पाहून अभय जागीच थबकला. तिला पाहून आज अनेक वर्षे झालेली असली तरी पण आपल्या आईला तो कसा विसरू शकणार होता.

आईला पाहून त्याच्या भावनांचा बांध तो रोखू शकला नाही. नकळत त्याच्या डोळ्यात अश्रू आले. पण त्याने लगेच गालावरचे अश्रू हातांनी पुसून घेतले. त्याची आई अजूनही मैत्रिणींसोबत बोलण्यात बिझी असल्याने तिचे त्याकडे फारसे लक्ष नव्हते. आईला पाहून तिला मिठी मारावी, तिच्या कुशीत डोकं ठेवून मनसोक्त रडाव असे अभय च्या मनाला वाटले. पण बुद्धी मात्र त्याला तसे करण्यापासून रोखत होते.

त्याच्या मनाचे आणि बुद्धीचे हे द्वंद्व सुरू असताना तो दारात तसाच काहीही न बोलता उभा आहे हे त्याच्या आईच्या लक्षात आले. त्याचा तो गबाळा अवतार आणि चेहऱ्याला रुमाल बांधून असल्याने त्याच्या आईने त्याला नीट पाहिले नव्हते. आणि अनेक वर्षे न पाहिल्याने न भेटल्याने त्याला ओळखणे कठीण होते. त्याला तसेच उभे असलेले पाहून त्याची आई त्याला म्हणाली.

क्रमशः

जगण्याचा संघर्ष – भाग २ (अंतिम भाग)

Tags: Marathi emotional storymarathi motivationmarathi suvicharmarathi viral storiesकौटुंबिक कथामराठी कथासंघर्ष
Previous Post

प्रेमाची संपत्ती

Next Post

जगण्याचा संघर्ष – भाग २ (अंतिम भाग)

alodam37

alodam37

नमस्कार, मला लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला आवडते. मी लिहिलेल्या कथा ह्या माझ्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांवर आधारित असतात. लिखाणातून मला निखळ आनंद मिळतो. तुम्हाला ही माझ्या कथा आवडतील अशी अपेक्षा आहे. 😊

Next Post

जगण्याचा संघर्ष - भाग २ (अंतिम भाग)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय

बापमाणूस

बापमाणूस

by alodam37
June 19, 2026
0

  पारूला डिलिव्हरी साठी सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. पारूची अवस्था बघून हरी सुद्धा घाबरला होता. काहीही न सुचल्याने दवाखान्यातच...

एक अनोखे धोंडेजेवण

एक अनोखे धोंडेजेवण

by alodam37
June 12, 2026
0

  सावीचे लग्न होऊन अजून वर्षही पूर्ण झाले नव्हते. मागच्या वर्षीच तिचा विवाह सुमितसोबत मोठ्या आनंदात झाला होता. सुमित एका...

चांगुलपणाचे ओझे

चांगुलपणाचे ओझे – भाग २ (अंतिम भाग)

by alodam37
June 4, 2026
0

फोन कट करून मीना वैशालीजवळ गेली आणि तिला म्हणाली.   " माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे वैशाली...आणि वहिनी खूप जास्त आग्रह...

चांगुलपणाचे ओझे

by alodam37
June 4, 2026
0

" वैशाली...जरा लवकर कर ना...दादा वहिनीला भूक लागली असेल अगं..." मीना आपल्या लहान जावेला म्हणाली.   " हो ताई...मी बस...

हरवलेलं प्रेम

हरवलेलं प्रेम – भाग ५

by alodam37
May 22, 2026
0

      लग्नाचा दिवस आला. मंडप सजला. सगळीकडे आनंद होता. आणि त्या मंडपाच्या प्रवेशद्वारातून मनिषा आत आली.   हा...

हरवलेलं प्रेम

हरवलेलं प्रेम – भाग ४

by alodam37
May 22, 2026
0

मेघनाने हळू आवाजात विचारलं,   "तू… काय म्हणालास?"   मिलिंद शांतपणे म्हणाला,   "मी खरं बोलतोय. जर तुला मान्य असेल…...

हरवलेलं प्रेम – भाग ३

हरवलेलं प्रेम – भाग ३

by alodam37
June 14, 2026
0

  एक दिवस पावसात तो तिला भेटायला गेला. उद्या त्यांना काउन्सिलर कडे जायचे होते. त्यासंदर्भात काही सूचना द्यायच्या म्हणून तो...

Load More
  • Home
  • About us
  • contact us
  • Disclaimer
  • Privacy Policy

Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • कथा
  • वैचारिक
  • मितवा
  • कथामालिका
  • कविता
  • नारीवाद
  • प्रेम
  • भयपट
  • मनोरंजन
  • माहितीपूर्ण
  • राजकीय
  • विज्ञान
  • विनोदी
  • शिक्षण
  • सामाजिक

Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697

error: Content is protected !!