हरवलेलं प्रेम – भाग ४

मेघनाने हळू आवाजात विचारलं,   “तू… काय म्हणालास?”   मिलिंद शांतपणे म्हणाला,   “मी खरं बोलतोय. जर तुला मान्य असेल… तर आपण लग्न करू शकतो.”   मेघनाच्या आईच्या डोळ्यांत पाणी आलं.   “बाळा… तू आम्हाला कोणत्या संकटात वाचवत आहेस ह्याची तुला कल्पना नाही..” त्या म्हणाल्या. मेघना अजूनही विचारात होती.   “पण… तुझं लग्न झालं होतं … Read more

शेवटचा घास (आई आणि मुलाची हृदयस्पर्शी कथा)

  साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात देशमुख कुटुंब राहत होतं. साधं, शांत आणि प्रेमळ कुटुंब. कुटुंबात आई सुमित्राताई वडील गणेशराव आणि त्यांचा मुलगा रोहन. घर मोठं नव्हतं, पण त्या घरात मायेची उब भरपूर होती.   गणेशराव गावातल्या सहकारी बँकेत कारकून म्हणून काम करत होते. रोज सकाळी सातला उठायचे, चहा घ्यायचे आणि सायकलवरून बँकेत जायचे. सुमित्राताई घरकाम … Read more

मराठी कथा – जाणिव

मंदाताईंनी आपल्या मुलीचे लग्न एका चांगल्या कुटुंबात करुन होते. सुवर्णा दिसायला चांगली आणि शिकलेली मुलगी होती. तिचा नवरा संकेत मुंबईत एका चांगल्या नोकरीत कार्यरत होता. त्याचा मुंबईत स्वतःचा टूबीएचके चा फ्लॅट होता. सुवर्णाचे सासू सासरे गावी राहायचे. त्यांचा चांगला राजा राणीचा संसार सुरू होता सुवर्णा आणि संकेतचा. आपल्या मुलीला आनंदात पाहून मंदाताई खूप खुश होत्या. … Read more

मराठी कथा/ वारस – भाग ४( अंतिम भाग)

थोड्याच वेळात रिक्षा राधाच्या, म्हणजेच अर्णवच्या आजोळच्या घरी पोहचली सुद्धा. राधासोबत अर्णवला आलेलं पाहून राधाच्या सासुबाई एकदमच हरखल्या. त्यांनी त्याला जवळ घेतले. डोक्यावरून हात फिरवला आणि मिठी मारली. त्याचे मामा आणि आजोबा सुद्धा त्याला पाहून आनंदून गेले. त्याचे किती लाड करू अन् किती नाही असे झाले होते सर्वांना. लहानग्या अर्णवला हे सर्व काय होतंय ते … Read more

मराठी कथा / वारस – भाग ३

तशी निमाताईंना तिला मदत करायला काहीच हरकत नव्हती. पण तिच्या सांगण्याची पद्धत मात्र त्यांना रूचायची नाही. सुरुवातीला अर्णव रडल्यावर लगेच त्याच्या जवळ जाणारी कल्पना आता तो रडून रडून दमून जायचा तरीही त्याला लवकर जवळ घ्यायची नाही. निमाताईंना हा बदल लक्षात आला होता पण दोघांचा नवीन नवीन संसार आहे हा विचार करून त्यांनी दोघांनाही तसे बोलून … Read more

तुझ्याविना मी – भाग ७

” मी सुद्धा इथे थांबायला नाही आलोय…पण निशाची ईच्छा होती की आमच्या लग्नाला तुमचे आशीर्वाद मिळावेत म्हणून आलो आहे…तुमचा राग मला कळतोय…पण तुम्ही एकदा शांतपणे आमच्या निर्णयाचा विचार करा…मग तुम्हालाही कळेल आम्ही हे सगळे का केले ते…” साकेत म्हणाला. ” मला काहीच ऐकून घ्यायचे नाही…तुम्ही जा इथून…” वसंतराव स्वतःच्या खोलीत जात म्हणाले. त्यासरशी निशा आणि … Read more

निर्णय (मराठी कथा )- भाग २८

रवी ने सुजाता चा एवढा विचार केला होता हे माहीत झाल्यावर त्याचे आई बाबा कृतकृत्य झाले होते. आपला मुलगा मनाने वाईट नव्हता हे ते जाणून होते. फक्त व्यसनामुळे तो तसा बनला होता. पण स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्ये त्याला आयुष्याच्या शेवटच्या घडीला सुद्धा ठावूक होते आणि त्याने आपले कर्तव्य बजावले सुद्धा. तरीही जाताना त्याला ह्या गोष्टीची … Read more

निर्णय ( मराठी कथा )- भाग २५

सगळं काही ऐकून घेतल्यावर आई म्हणाली. ” नकुलला एक मैत्रीण आहे ह्याचा तुला त्रास होतोय की तो तुझ्यापेक्षा जास्त तिच्याशी मनमोकळेपणाने बोलतो ह्याचा तुला त्रास होतोय…” नंदिनी गप्प बसली…नेमके काय उत्तर द्यावे ते तिला कळत नव्हते. मग काहीतरी मनाशी आठवून ती म्हणाली. ” तो जसा तिच्याशी चांगला बोलतो तसा माझ्याशी नाही बोलत ह्याचा राग आलाय … Read more

निर्णय – भाग ८

नंदिनी या लग्नाला तयार नाही आणि कधी नव्हे ती तिची आई सुद्धा विरोधात उभी आहे त्यामुळे नंदिनीचे लग्न रवीशी लावणे तिच्या बाबांसाठी जरा कठीण झाले होते. शिवाय नवरदेवाकडील मंडळी स्वतःहून मांडवातून निघून गेल्याने त्यांच्या मनातील ते ओझं जरा कमी झालं होतं. म्हणूनच मग त्यांनी सुनीलरावांच्या प्रस्तावाचा विचार करायचे ठरवले. नंदिनीची आई तर आधीच तयार होती. … Read more

निर्णय – भाग ६

” म्हणजे…तुला काय वाटतं…हे लग्न आता थांबणार का…अजिबात नाही…आजपर्यंत कधी ऐकलंस का नवरदेव वरात घेऊन आल्यावर लग्न तुटलं म्हणून…आजवर कमावलेली इभ्रत चव्हाट्यावर येईल अशाने…” आजी म्हणाली. ” पण यामुळे नंदिनीचं आयुष्य खराब होईल त्याचं काय…?” सरलाताईंनी प्रश्न विचारला. ” ती तिच्या नशिबाने राहील…तसंही प्रत्येक जण आपल्या नशिबाने खातो…तिच्या नशिबात चांगलं असेल तर चांगलं होईल…आणि वाईट … Read more