लोक काय म्हणतील ? – भाग ३ (अंतिम भाग)

” तिला घरची कामेच तर नीट जमत नाही…ती शिक्षणात काय दिवे लावणार आहे…?” तिची सासू म्हणाली. ” तो नंतरचा प्रश्न आहे…तुम्ही आधी संधी तर द्यायला हवी होती ना…आणि मुळात तुम्हाला हे करायचं नव्हतं तर आम्हाला आश्वासने का दिलीत खोटी…तुमचा मुलगा शिक्षक नाही हे का लपवले आमच्यापासून…” शारदा म्हणाली. शारदाच्या बोलण्यावर सगळे जण एकटक तिच्या काकांकडे … Read more

लोक काय म्हणतील ? – भाग १

  गौरीच्या आईने तिला पोटाशी धरलं. आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्या रोखू शकल्या नाहीत. त्यानंतर दोघीही मायलेकी बराच वेळ काहीच बोलल्या नाहीत. गौरीच्या आईने स्वयंपाकघरात जाऊन सकाळचे जे काही शिल्लक अन्न होते ते गौरीसाठी आणले. आणि गौरीने ते अगदी हपापल्या सारखे खाऊन टाकले. तोवर गौरीची लहान बहीण चंदा सुद्धा घरी आली. गौरीताईला असे अचानक समोर … Read more

काय भुललीस वरलीया रंगा – भाग ३ (अंतिम भाग)

” तू माझ्या प्रेमावर संशय घेतोस…अरे तुझ्यासाठी मी माझ्या दोन लहान मुलांना टाकून आलेय…” कावेरी म्हणाली. ” तेच तर…तू तुझ्या दोन लहान मुलांचा सुद्धा विचार केला नाहीस… मग मी असा कोण लागून गेलोय ग तुझा…बंद कर तुझी नाटकं…मी तुला कायमचा सोडून चाललोय…तुला आता काय करायचं ते तू ठरव…” अजय म्हणाला. आणि अजय खरोखर निघून गेला. … Read more

मला आई हवी – भाग २ (अंतिम भाग )

आपल्याच जगात रमणाऱ्या राजेश आणि राजश्री ला राजेशची आई आता भार वाटायला लागली होती. आणि राजेशच्या आईची मात्र एकाकीपणा मुळे तब्येत खालावत जात होती. आजारी आईची सेवा करणे दोघांनाही जमत नव्हते. त्यांनी चोवीस तास एका नर्सला त्यांची काळजी घेण्यासाठी नेमले होते. पण राजेशच्या आईला सतत राजेशची आठवण यायची आणि नर्स वारंवार राजेशला कॉल करायची की … Read more

सूर तेच छेडीता..!

   वृंदा हातात भलीमोठी बॅग घेऊन घराबाहेर निघत होती. तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आला होता. अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी तिने विनयकडे पाहिले. तो मात्र तिच्या नजरेला नजर देऊ शकला नाही. कारण तिच्या नजरेत त्याच्यासाठी असंख्य प्रश्न होते. आणि विनयकडे तिच्या प्रश्नांना ना उत्तरे होती ना तिच्यासाठी दोन धीराचे शब्द.    आज पहिल्यांदा असे झाले … Read more