निर्णय – भाग १३

    समोर रवीची आई उभी होती. त्यांना पाहून प्रकाशरावांना धक्का बसला. ते शालू ताईंकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.   मग शालूताई त्यांना म्हणाल्या.   ” अरे असा काय बघत आहेस??? मला इकडेच काम होतं आणि म्हटलं मी इकडे येत आहे तर तुलाही सोबत घेऊन यावं… शेवटी तुलाही कळायला हवं ना की तुझ्या बहिणीने तुझ्या … Read more

निर्णय – भाग १०

  सरलाताईंनी गरम गरम स्वयंपाक करून नंदिनीला वाढून दिले. सुरुवातीला संकोचणारी नंदिनी नंतर व्यवस्थित जेवली. उषाताईंनी हळूच एका कोपऱ्यात जाऊन सरला ताईंना फोन लावला आणि नंदिनी ची चौकशी केली. सरला ताईंनी नंदिनी कडे फोन नेऊन दिला. उषाताईंनी तिला विचारले.     कशी आहेस बाळा…?     ठीक आहे आई…     आणि असे म्हणताच तिचा … Read more

हरवलेलं प्रेम – भाग ५

      लग्नाचा दिवस आला. मंडप सजला. सगळीकडे आनंद होता. आणि त्या मंडपाच्या प्रवेशद्वारातून मनिषा आत आली.   हा तोच क्षण होता लग्नाचा…ज्या क्षणापासून ही कथा सुरू झाली होती. लग्नमंडप दिव्यांनी उजळून निघाला होता. रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीमुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेलं होतं. पाहुण्यांची ये-जा सुरू होती. कुठे गप्पा, कुठे हशा, तर कुठे फोटो … Read more

हरवलेलं प्रेम – भाग ४

मेघनाने हळू आवाजात विचारलं,   “तू… काय म्हणालास?”   मिलिंद शांतपणे म्हणाला,   “मी खरं बोलतोय. जर तुला मान्य असेल… तर आपण लग्न करू शकतो.”   मेघनाच्या आईच्या डोळ्यांत पाणी आलं.   “बाळा… तू आम्हाला कोणत्या संकटात वाचवत आहेस ह्याची तुला कल्पना नाही..” त्या म्हणाल्या. मेघना अजूनही विचारात होती.   “पण… तुझं लग्न झालं होतं … Read more

उंबरठ्यापलीकडचे सुख

  सुधाला एका मोठ्या घरातले स्थळ आले तेव्हा तिच्या माहेरी सगळेच आनंदाने हरखले होते. दिनकरच्या घरचे लोक म्हणजे मोठं प्रस्थ होतं. गावी त्यांचे मोठे वाड्यासारखे घर होते. दिनकरला आणखी 3 भाऊ होते. दिनकर पेक्षा मोठा एक भाऊ आणि दोन भाऊ अजून लहान होते.     सुधा कासखेडी सारख्या एका छोट्याशा गावात राहणारी एक साधी, कष्टाळू … Read more

शेवटचा घास (आई आणि मुलाची हृदयस्पर्शी कथा)

  साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात देशमुख कुटुंब राहत होतं. साधं, शांत आणि प्रेमळ कुटुंब. कुटुंबात आई सुमित्राताई वडील गणेशराव आणि त्यांचा मुलगा रोहन. घर मोठं नव्हतं, पण त्या घरात मायेची उब भरपूर होती.   गणेशराव गावातल्या सहकारी बँकेत कारकून म्हणून काम करत होते. रोज सकाळी सातला उठायचे, चहा घ्यायचे आणि सायकलवरून बँकेत जायचे. सुमित्राताई घरकाम … Read more

एक चुकलेला निर्णय – भाग २ (अंतिम भाग)

शिल्पाला वाटायचे की मीचांगल्या श्रीमंत घरातून आले आहे त्यामुळे माझे कौतुक सगळ्यांना जास्त असायला हवे. माझ्या मताला घरात जास्त किंमत असावी. मीनाक्षीला घरात जेवढा मान मिळतो तेवढा आपल्याला मिळत नाही असे तिला वाटायला लागले होते. घरात सगळेच मीनाक्षीच्या हातच्या स्वयंपाकाची, तिच्या स्वभावाची सगळे स्तुती करायचे ते शिल्पाला हल्ली खटकायला लागले होते.   विशेषकरून धीरज जेव्हा … Read more

मराठी कथा/ वारस – भाग ४( अंतिम भाग)

थोड्याच वेळात रिक्षा राधाच्या, म्हणजेच अर्णवच्या आजोळच्या घरी पोहचली सुद्धा. राधासोबत अर्णवला आलेलं पाहून राधाच्या सासुबाई एकदमच हरखल्या. त्यांनी त्याला जवळ घेतले. डोक्यावरून हात फिरवला आणि मिठी मारली. त्याचे मामा आणि आजोबा सुद्धा त्याला पाहून आनंदून गेले. त्याचे किती लाड करू अन् किती नाही असे झाले होते सर्वांना. लहानग्या अर्णवला हे सर्व काय होतंय ते … Read more

मराठी कथा / वारस – भाग ३

तशी निमाताईंना तिला मदत करायला काहीच हरकत नव्हती. पण तिच्या सांगण्याची पद्धत मात्र त्यांना रूचायची नाही. सुरुवातीला अर्णव रडल्यावर लगेच त्याच्या जवळ जाणारी कल्पना आता तो रडून रडून दमून जायचा तरीही त्याला लवकर जवळ घ्यायची नाही. निमाताईंना हा बदल लक्षात आला होता पण दोघांचा नवीन नवीन संसार आहे हा विचार करून त्यांनी दोघांनाही तसे बोलून … Read more