हरवलेलं प्रेम – भाग २

    तो घरी आला आणि तडक आपल्या रूम मध्ये गेला. मनिषा सुद्धा रात्रभर झोपली नव्हती. आता काय होईल ह्याची तिला भीती वाटत होती. तो आल्यावर तिने घाबरलेल्या अवस्थेत त्याला बघितले. तिला पाहताच तो म्हणाला.   ” पुढे काय करायचे ठरवले आहेस..?”   ” मी..मी..काहीच ठरवले नाही अजून…” ती घाबरतच म्हणाली.   ” पण काही … Read more

हरवलेलं प्रेम

लग्नमंडपात गजबज होती. सगळीकडे फुलांची सजावट, रोषणाई आणि गाण्यांचा आवाज. पाहुणे एकमेकांशी गप्पा मारत होते. मुलं इकडेतिकडे पळत होती. वातावरणात आनंद होता.   आज मिलिंदचं लग्न होतं. मिलिंद शांतपणे स्टेजवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. पण त्याच्या डोळ्यांत मात्र एक विचित्र शांतता होती. पाहुणे येत होते, अभिनंदन करत होते.   तेवढ्यात मंडपाच्या प्रवेशद्वारातून … Read more

गोष्ट एका पैठणीची

आज मंजिरी खूप आनंदात होती. तिने 11 महिने भिशी टाकून एक सुंदर पैठणी खरेदी केली होती. तिच्याकडे लग्नात घेतलेली एक पिवळी पैठणी होती. पण त्यानंतर ती पैठणी घेऊनच शकली नव्हती. तिच्या एका मैत्रिणीने तिला या भिशीबद्दल सांगितले तेव्हा तिच्या डोक्यात कल्पना आली की अशा प्रकारे का होईना ती पैठणी घेऊच शकते की. म्हणून तिने मागच्या … Read more

पुन्हा उमललेल नातं

प्रियाची आज पहिली वटपौर्णिमा होती. प्रिया सुंदर हिरव्या रंगाची साडी घालून तयार झाली होती. लग्न झाल्यावर शांतनू ने मोठ्या हौसेने तिच्यासाठी ही हिरव्या रंगाची पिवळी किनार असलेली साडी आणली होती. गळ्यात ठुशी आणि मोठ मंगळसूत्र घातलं होतं. केसांचा अंबाडा आणि त्यावर सुंदर मोगऱ्याचा गजरा माळला होता. साधासा मेकअप केल्याने सुद्धा प्रियाचे सौंदर्य खुलून आले होते. … Read more

उंबरठ्यापलीकडचे सुख

  सुधाला एका मोठ्या घरातले स्थळ आले तेव्हा तिच्या माहेरी सगळेच आनंदाने हरखले होते. दिनकरच्या घरचे लोक म्हणजे मोठं प्रस्थ होतं. गावी त्यांचे मोठे वाड्यासारखे घर होते. दिनकरला आणखी 3 भाऊ होते. दिनकर पेक्षा मोठा एक भाऊ आणि दोन भाऊ अजून लहान होते.     सुधा कासखेडी सारख्या एका छोट्याशा गावात राहणारी एक साधी, कष्टाळू … Read more

मदर्स डे

आज सईला खूप ताप आला होता. तरीही ती स्वयंपाकघरात उभी राहून पोळ्या करत होती. अरविंदला जाणीव होती की तिला बरे नाही. तरीही तिची चौकशी न करता अरविंदने तिला फक्त एवढंच विचारलं,   “ माझा डबा तयार झाला का?” त्याचे बोलणे ऐकून सईच्या डोक्यात पाणी आले. पोरकेपणाची भावना अजून गडद झाली. अरविंद तिच्याशी कायम तुटक वागायचा. … Read more

शेवटचा घास (आई आणि मुलाची हृदयस्पर्शी कथा)

  साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात देशमुख कुटुंब राहत होतं. साधं, शांत आणि प्रेमळ कुटुंब. कुटुंबात आई सुमित्राताई वडील गणेशराव आणि त्यांचा मुलगा रोहन. घर मोठं नव्हतं, पण त्या घरात मायेची उब भरपूर होती.   गणेशराव गावातल्या सहकारी बँकेत कारकून म्हणून काम करत होते. रोज सकाळी सातला उठायचे, चहा घ्यायचे आणि सायकलवरून बँकेत जायचे. सुमित्राताई घरकाम … Read more

आईची ममता पैशांपेक्षा मोठी असते.

  राधा एका गरीब कुटुंबातील साधी, शांत आणि समजूतदार मुलगी होती. तिच्या आयुष्यात फार अपेक्षा नव्हत्या—फक्त शांत संसार, प्रेम करणारा नवरा आणि दोन वेळचे सुखाचे जेवण. तिचे लग्न शिरीषशी झाले तेव्हा तिला वाटले की तिचे आयुष्य स्थिर झाले.   शिरीष मध्यमवर्गीय कुटुंबातील धाकटा मुलगा होता. तो एका छोट्या कंपनीत नोकरी करायचा. पगार फार मोठा नव्हता, … Read more

प्रायश्चित्त

विश्वासरावांना दोन मुली. गायत्री आजी कल्याणी. गायत्री त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे तर कल्याणी त्यांची स्वतःची मुलगी आहे. गायत्री त्यांच्या एका मित्राची मुलगी होती. तिच्या आईवडिलांच्या अपघाती जाण्याने गायत्री पोरकी झाली होती. तेव्हा विश्वासरावांनी स्वतःहून गायत्रीची जबाबदारी स्वीकारली आणि तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे लग्नाचे मोठे केले. कल्याणी सुद्धा गायत्री लहान बहिण मानायची. पण विश्वासरावांची बायको विनिताताई … Read more