जगावेगळे नाते आपुले – भाग ३ ( अंतिम भाग)

मयंक मात्र तोवर जर्मनीला निघून गेला होता. मधुरा मात्र अजूनही तिच्या सासू सासर्यांकडेच राहत होती. कारण ती ज्या शाळेत शिकवत होती त्या शाळेच्या परीक्षा आता जवळ आलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तिने स्वतःचे दुःख न कुरवाळता मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याचे ठरवले होते. मयंकने वसंतराव आणि नीलिमा ताईंना त्यांची मन शरमेने खाली … Read more

जगावेगळे नाते आपुले – भाग २

तेव्हा मात्र वसंतरावांनी मयंककडे मधुराला सोबत नेण्याबद्दल पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर मात्र मयंकने त्यांच्याशी बोलणे थोडे कमी केले असल्याचे त्यांना जाणवले. मधुरा सुद्धा मयंक ची खूप आतुरतेने वाट पाहत होती. हो नाही करत शेवटी लग्नाला दहा महिने झाले तेव्हा मयंक भारतात परतला. घरात सगळ्यांनाच खूप आनंद झाला. मधुराला तर जणू पंखच लागले होते. तिच्या चेहऱ्यावरील … Read more

जगावेगळे नाते आपुले – भाग १

आज देशमुखांच्या घरात पूजा होती. त्यानिमित्ताने सगळी साग्रसंगीत तयारी केलेली दिसत होती. सोसायटी मधील महिला आणि दूरचे नातेवाईक एक एक करून येत होते. पूजेला सुरुवातच होणार होती. बायका आपापसात कुजबुज करत होत्या. बाजूच्या सामंत काकू म्हणाल्या. ” ह्याचं पण भलतंच काहीतरी सुरू असतं हा…पूजा करतायेत ते ठीक आहे एकवेळ…पण त्या निमित्ताने घराची सजावट काय केलीय…आणि … Read more

लग्न झालं की सुधारेल ? – भाग २ (अंतिम भाग)

” अग लग्न मोडल्याचा पुरुषांवर काहीच परिणाम होत नाही…त्यांना तर आरामात दुसरी बायको मिळते…कठीण असतं ते बायकांसाठी…त्यांना समाजाचे दूषण मिळतात…” काकू म्हणाल्या. ” नाही काकू…आजकाल जग बदलतंय…आधी पुरुषाचे दुसरे लग्न असेल तरीही त्याला आरामात मुलगी मिळायची लग्नाला…पण आता मात्र मुलीकडचे खूप चौकशी करतात…आधीच लग्न का मोडल…वगैरे वगैरे…आणि डिव्होर्स घेणे हा काही अपराध नाही ज्यामुळे घटस्फोटित … Read more

लग्न झालं की सुधारेल ? – भाग १

नेहा सहजीवन सोसायटी मध्ये राहायला येऊन जवळपास एक महिना झाला होता. निशांत ऑफिस मध्ये गेल्यावर दिवसभर नेहा एकटीच घरी राहायची. नवीन सोसायटी असल्याने अजून तिची इथे फारशी ओळख सुद्धा झालेली नव्हती. पण शेजारच्या मीना काकू मात्र तिच्या चांगल्याच ओळखीच्या झाल्या होत्या. मीना काकू पहिल्या दिवशीच नेहाची विचारपूस करायला तिच्याकडे आल्या होत्या. आणि तेव्हापासून त्यांचे नेहाच्या … Read more

लोक काय म्हणतील ? – भाग ३ (अंतिम भाग)

” तिला घरची कामेच तर नीट जमत नाही…ती शिक्षणात काय दिवे लावणार आहे…?” तिची सासू म्हणाली. ” तो नंतरचा प्रश्न आहे…तुम्ही आधी संधी तर द्यायला हवी होती ना…आणि मुळात तुम्हाला हे करायचं नव्हतं तर आम्हाला आश्वासने का दिलीत खोटी…तुमचा मुलगा शिक्षक नाही हे का लपवले आमच्यापासून…” शारदा म्हणाली. शारदाच्या बोलण्यावर सगळे जण एकटक तिच्या काकांकडे … Read more

लोक काय म्हणतील ? – भाग २

काकांनी लगेच दोन दिवसात मुलाकडच्यांना मुलीला पाहायला घरी बोलावले देखील. सगळे सोपस्कार त्यांच्या घरीच पार पडले. मुलाकडच्यांनी मुलीला पसंत केले आणि  लवकरच लग्नाचा मुहूर्त देखील निघाला. साधेपणाने लग्न करायचे ठरले आणि महिन्याभरात गौरी आणि प्रशांतचे लग्न झाले देखील. गौरीचे लग्न झाल्याने शारदा निश्चिंत झाली. तिला वाटले आता गौरीचे पुढचे शिक्षण तिच्या नवऱ्याच्या साथीने उत्तम रित्या … Read more

लोक काय म्हणतील ? – भाग १

  गौरीच्या आईने तिला पोटाशी धरलं. आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्या रोखू शकल्या नाहीत. त्यानंतर दोघीही मायलेकी बराच वेळ काहीच बोलल्या नाहीत. गौरीच्या आईने स्वयंपाकघरात जाऊन सकाळचे जे काही शिल्लक अन्न होते ते गौरीसाठी आणले. आणि गौरीने ते अगदी हपापल्या सारखे खाऊन टाकले. तोवर गौरीची लहान बहीण चंदा सुद्धा घरी आली. गौरीताईला असे अचानक समोर … Read more

नुसतं प्रेम असून चालत नाही – भाग २ (अंतिम भाग )

” कधी सांगणार आहेस… तुझं लग्न झाल्यावर…अरे तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या घरच्यांना आपल्याबद्दल सगळं सांगितलं होतं…आता कोणत्या तोंडाने मी त्यांना सांगू की आदित्यच्या लग्नासाठी मुली पाहणं सुरू झाल्या आहेत म्हणून…कसं सांगू की आदित्य ने त्यांच्या बोलण्याला अजिबात सीरिअसली घेतलेलं नाही म्हणून…?” रेवती म्हणाली. ” अगं इतकी मोठी गोष्ट सुद्धा नाही बघ ही…आता फक्त सुरूच … Read more

नुसतं प्रेम असून चालत नाही – भाग १

एके दिवशी अचानक आदित्यला फोन आला की त्याच्या वडिलांचा एक छोटासा ॲक्सिडेंट झालाय ताबडतोब हॉस्पिटलला या म्हणून. तो लगेच हॉस्पिटल मध्ये गेला. तिथे गेल्यावर कळले की त्याच्या वडिलांच्या हाताला थोडा मार लागलाय. डॉक्टरांनी हाताला आधीच मलमपट्टी केली होती. त्याचा मोठा भाऊ सुद्धा तिथे पोहचला होता. डॉक्टरांनी ह्याला काही औषधं लिहून दिली आणि लगेच आणायला सांगितली. … Read more